Wednesday, August 4, 2021

हेच खरे टिळक !

 हेच खरे टिळक ! 

उठसूट कुणीही यावे आणि टिळकांबद्दल नको ते लिहावे हे आता फार काळ चालणार नाही, डॉ. निशांत पाटील नावाच्या कुणीतरीचा आक्षेप आहे, त्याला ही उत्तरे आणि काही प्रश्नसुद्धा ? खरतर अशांची आजीबात दखल घेऊ नये, पण आपल्यापैकी तरुण पिढीचा गैरसमज होऊ नये म्हणून हे लेखन. जास्तीत जास्त शेअर करावे.

अथणीच्या सभेचा सतत उल्लेख होतो पण त्यात टिळक काय म्हणाले होते ब्राह्मणांनी पळीपंच पात्रासह कौन्सिलात जाऊन काय संध्या करायची आहे काय ? असा प्रश्न विचारला होता हे का सांगत नाही ? यापुढे जाऊन टिळक म्हणतात “कायदेकौन्सिलात उद्या सगळेच ब्राह्मणेतर आले तरी मला चालतील, पण तेथे लोकनियुक्त हिंदूंचे प्राबल्य असले पाहिजे, परक्यांचे किंवा सरकारनियुक्तांचे प्राबल्य नसले पाहिजे.” कायदेकौन्सिलात उद्या सगळेचं ब्राह्मणेतर आले तरी चालतील असे लोकमान्य म्हणतात. टिळकांनी आपल्या मुलांना स्वतः सांगितले होते की तुम्ही उद्या चपला शिवायचा व्यवसाय केला तरी मला आनंदच होईल, यावरून तिलक किती पुढारलेले होते याची कल्पना येईल.

२३ मे १९१७ रोजी नाशिकच्या भाषणात टिळक म्हणाले होते, “स्त्री शिक्षण, मोफत शिक्षण, मागासलेल्यांचे शिक्षण, सामाजिक सुधारणा वगेरे गोष्टींस आम्ही प्रतिकूल नाही व नव्हतो, “राष्ट्रीय शिक्षण ब्राह्मणांकरिताच नको आहे, अंत्यजाला, चांभाराला, सोनाराला सर्वांनाच ते शिक्षण मिळाले पाहिजे.” इतकेचं बोलून टिळक थांबत नाहीत तर पुढे, “जातीभेद मोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यास समजले पाहिजे. जातीजातींचे तंटे न होऊ देण्याची जबाबदारी घेणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे..” यवतमाळ अकोला भुसावळ वगैरे सभेचा पाटील यांनी दिलेला उल्लेख खोटा आहे.



गाडगेबाबांची भेट वगैरे उल्लेखला ऐतिहासिक आधार नाही. टिळक काय म्हणतात बघा, “कष्टकर्यांचे मनोबल वाढवतांना टिळक म्हणतात, तुम्ही खालच्या जातीचे आहात म्हणून कमीपणा आजीबात मानू नका, तुम्हा मजुरांमध्ये साधुसंत निर्माण झाले, आणि त्यांच्या चरणी आम्ही ब्राह्मण लीन झालो.” स्पष्टच दिसते की, धर्मनिर्णय, किंवा धर्मप्रवचने कुणा एका जातीची मक्तेदारी आहे हे टिळकांना मान्यच नव्हते. त्याला राष्ट्रवादाची जोड देऊन टिळक विचार आपल्याला सांगतो की जात, धर्म ,वंश हे देशाच्या शासन व्यवस्थेवर कधीही प्रभावी ठरू नयेत. राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकांमधील गुणांचा विकास झाला की कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च पदावर जाण्याचा मार्ग मोकळा आहे, मग तुमची जात, धर्म कुठला का असेना !

 ब्राह्मणेतर आणि त्यातल्या त्यात मराठे यांच्यातले हे गैरसमज दूर करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंद्यांना अखिल भा



रतीय कार्यक्रमाची गरज वाटली, त्यातून ते अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद घेण्याच्या तयारीला लागले. त्यासाठी शिंद्यांना टिळकांची उपस्थिती हवी होतीच. टिळकांनी येऊन भाषण केले, टिळकांच्या भाषणाचा वृत्तांत शिंद्यांच्या शब्दात, “पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पाखालीतील पाणी ब्राह्मण प्याले...if a god were to tolerate untouchability, I would never recognize him as a god at all…अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही. ( हे उद्गार ऐकून जो गजर उडाला त्यात मंडप कोसळून पडतोसे वाटले.).. मी येथे आज शरीराने प्रथम आलो आहे, तरी मनाने ह्या चळवाळीत नेहमीच आहे....जुन्या काळी ब्राह्मणांच्या जुलुमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण ह्या रोगाचे आता निर्मुलन झालेच पाहिजे’ वैगेरे त्यांच्या तोंडचे शब्द भावी इतिहासात दुमदुमत राहतील.” या परिषदेचे अध्यक्ष खुद्द बडोदा संस्थांचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते याची नोंद घेतली पाहिजे. आता हे टीकाकार शाहू फुले यांच्या चळवळीतील चळवळीतील विठ्ठल रामजी शिंदे यानाही खोटं ठरवणार का ? मध्यंतरी असेही ऐकले की लोकमान्यांवर निरर्थक टीका करणाऱ्यांवर आता टिळक कुटुंबातर्फे खटले भरले जाणार आहेत हेही जाता जाता सांगतो.

--- पार्थ बावस्कर ( लेखक, इतिहास अभ्यासक )